देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर जाणारे क्रांतिकारक चापेकर बंधूंच्या आयुष्यावर आधारित ही चरित्रात्मक कादंबरी आहे. चापेकर बंधूंच्या बलिदानाची भा. द. खेर यांनी लिहिलेली ही रसाळ आणि रोमांचकारी कहाणी आहे. पुण्यात प्लेगची साथ आली तेव्हा ब्रिटीश अधिकारी रँडने जनतेवर अत्याचार केले. त्याने महिला व लहान मुलांनाही सोडले नाही. हा अनन्वीत छळ चापेकर बंधूंनी पाहिला होता. अनुभवला होता.
ब्रिटीश साम्राज्याला धडका देण्याचा त्यांचा संकल्प रँडचा वध करून त्यांनी प्रत्यक्षात आणला; परंतु त्यांच्यावर खटला चालवून त्यांना फासावर लटकविण्यात आले. मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी एकाच कुटुंबातील तिघा बंधूंना फाशी देण्याची जगाच्या इतिहासातील ही कदाचित एकमेव घटना आहे. चापेकर बंधूंची जडणघडण कशी झाली, त्यांच्या मनात रुजलेले देशप्रेम आणि तत्कालीन स्थिती याचीही ही प्रेरणादायी कथा आहे.
प्रकाशक : विहंग प्रकाशन
पाने : २०८
किंमत : १७० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)